|| श्री ||
आज जागतिक पुस्तक दिन असल्याचं खूपच उशिरा समजलं. ( या जागतिक दिनांची यादी कुठे मिळते का हो ? ) तर असो. मग मनातल्या पुस्तक प्रेमाने उचल खाल्ली आणि लिहायला बसलो. पुस्तक वाचन हा माझा एकेकाळचा अत्यंत आवडता छंद . पुस्तक वाचनापासून ते पुस्तक लिखाणा पर्यन्तचा माझा प्रवास थोडक्यात उलगडतो.
वाचनाची आवड त्या दिवसात इतकी होती कि बसल्या बैठकीला जाडजूड पुस्तक वाचून केंव्हा संपलं ते त्या दिवसात कळायचं नाही . मला आठवतंय , मी ३ री ४ थीत असेन . एक गृहस्थ सायकलीला मोठ्ठी पिशवी टांगून आमच्या घरी यायचे . त्यांच्या त्या पिशवीत कादंबऱ्या , रहस्य कथा वगैरे पुस्तके असायची .मग माझी आई त्यातून निवडून पुस्तके घ्यायची . माझ्या साठीही बिरबल , चांदोबा , हतीम ताई , अलिबाबा अश्या पुस्तकांची मागणी व्हायची . ती पुस्तके देऊन तो गृहस्थ निघून जायचा . गौरवार हे त्या गृहस्थाचं नावही मला चांगला स्पष्ट आठवतंय हे माझ्या बघण्यातल पाहिलं फिरतं वाचनालय . २ ते ३ वर्षे हे गृहस्थ आमच्या घरी ते त्यांचे फिरते वाचनालय घेऊन यायचे . परी कथा , चांदोबा वाचून कंटाळल्यावर मी रहस्य कथांकडे वळलो . बाबुराव अर्नाळकर , गुरुनाथ नाईक अश्या नामवंत लेखकांच्या रहस्य कथा वाचण्याचा छंदच जडला आणि ह्या कथा वाचून मग आजूबाजूला सगळीकडे रहस्येच दिसायला लागायची . त्याच वेळेला भा. रा. भागवतांचा बन्या उर्फ फास्टर फेणे ही आवडायला लागला . इतका कि तो काल्पनिक आहे हे सत्य पचवायला जड जाऊ लागले . असं वाटायचं कि त्याला जाऊन कधीतरी भेटलेच पाहिजे . त्याच बरोबरीने वेताळाच्या कॉमिक्स कथा खूप आवडायच्या . चि .वी. जोशींचे “ चिमणराव गुंड्याभाऊ ” पण मनाला खूप भावले होते . माझी ठाण्याला राहणारी मावशी तिकडून किशोर , कुमार , आनंद , चंपक अशी पुस्तके पार्सलने पाठवायची . तेंव्हा पंढरपुरात चांगलं पुस्तकांचं दुकान असं न्हवत . तेंडूलकरांचं एकमेव दुकान आमच्यासाठी वरदान होत . रहस्य कथा वाचून मी हि तेंव्हा तश्या कथा लिहिण्याचा केलेला प्रयत्न मला आठवतोय . त्याच प्रमाणे गल्लीत राहणाऱ्या अंजू वैद्यने आणि मी मिळून कुठून कुठून गोळा केलेले विनोद , चित्रे , कविता यांचे हस्तलिखित एकत्र करून ते आमच्या मित्रांपुरत प्रकाशित केलं होतं.
महाविद्यालीन जीवनात प्रवेश केल्या नंतर विट्याला शिक्षणासाठी असताना तिथल्या वाचनालयात व्यंकटेश माडगुळकरांचे " करुणाष्टक " वाचनात आले . माझ्या माहिती प्रमाणे हे मी वाचलेले पहिले संपन्न ललित लिखाण . त्यानंतर मग अश्या वैचारिक , ललित लिखाणांची ओढच लागली . याच वेळी वसंत सबनीसांची पुस्तके हि वाचनात आली . त्यांचे " बन्या बापू "मला खूपच आवडले इतके कि त्या आधारानेच मी माझी पहिली कथा " मी लाच घेतो " लिहिली ( १९८८मध्ये ) आणि गम्मत म्हणजे त्याच वर्षी ती " बुलंद " या दिवाळी अंकात छापूनही आली . म्हणजे माझ्या लिखाणाची प्रेरणा सबनीस आहेत असे म्हणायला हरकत नाही .जयवंत दळवींची " महानंदा " हि कादंबरी पण अशीच मनाला भावली होती . जणू त्या महानंदेच्या मी तेंव्हा प्रेमात पडलो होतो . त्यानंतर व पु काळे , माडगुळकर . शंकरराव खरात , द मा मिरासदार , अण्णा भाऊ साठे , गो नि दांडेकर , पु ल देशपांडे , अत्रे , जी ए कुलकर्णी अश्या नामवंतांची पुस्तके वाचण्याचा नादच लागला . तो आज पर्यंत . कालानुरूप मी सुध्धा लिखाण करत गेलो . वेगवेगळ्या दिवाळी अंकातून त्या कथा कविता प्रसिध्ध झाल्या . काही एकांकिका लिहिल्या आणि त्याचे प्रयोग केले . कथाकथनाचे हि अनेक ठिकाणी प्रयोग केले .
गेल्या वर्षी अचानक माझं एक स्वलिखित पुस्तक ( कथासंग्रह ) बाजारात आला . “ भंगार वाडा ” हे त्या पुस्तकाचं नाव . आमच्या वाड्यात चार ते पाच कुटुंबे गुण्या गोविंदाने , हसून खेळून नांदतात . हे आमच्या मधले भावबंध , आपुलकी , हसरा खेळकर पणा मी या कथा संग्रहात मांडलाय . अर्थात थोडी रहस्य आणि विनोदाची काल्पनिक फोडणी देऊन .आणखी चार पुस्तकाचं लिखाण तयार आहे . बघुयात कधी योग येतोय ते
पण हे सगळे शक्य झाले ते वाचनामुळे . पुस्तकांनी माझं जगणं समृद्ध केलं . अजूनही ते समृद्ध होतंच आहे . जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
........श्याम सावजी ......पंढरपूर
आज जागतिक पुस्तक दिन असल्याचं खूपच उशिरा समजलं. ( या जागतिक दिनांची यादी कुठे मिळते का हो ? ) तर असो. मग मनातल्या पुस्तक प्रेमाने उचल खाल्ली आणि लिहायला बसलो. पुस्तक वाचन हा माझा एकेकाळचा अत्यंत आवडता छंद . पुस्तक वाचनापासून ते पुस्तक लिखाणा पर्यन्तचा माझा प्रवास थोडक्यात उलगडतो.
वाचनाची आवड त्या दिवसात इतकी होती कि बसल्या बैठकीला जाडजूड पुस्तक वाचून केंव्हा संपलं ते त्या दिवसात कळायचं नाही . मला आठवतंय , मी ३ री ४ थीत असेन . एक गृहस्थ सायकलीला मोठ्ठी पिशवी टांगून आमच्या घरी यायचे . त्यांच्या त्या पिशवीत कादंबऱ्या , रहस्य कथा वगैरे पुस्तके असायची .मग माझी आई त्यातून निवडून पुस्तके घ्यायची . माझ्या साठीही बिरबल , चांदोबा , हतीम ताई , अलिबाबा अश्या पुस्तकांची मागणी व्हायची . ती पुस्तके देऊन तो गृहस्थ निघून जायचा . गौरवार हे त्या गृहस्थाचं नावही मला चांगला स्पष्ट आठवतंय हे माझ्या बघण्यातल पाहिलं फिरतं वाचनालय . २ ते ३ वर्षे हे गृहस्थ आमच्या घरी ते त्यांचे फिरते वाचनालय घेऊन यायचे . परी कथा , चांदोबा वाचून कंटाळल्यावर मी रहस्य कथांकडे वळलो . बाबुराव अर्नाळकर , गुरुनाथ नाईक अश्या नामवंत लेखकांच्या रहस्य कथा वाचण्याचा छंदच जडला आणि ह्या कथा वाचून मग आजूबाजूला सगळीकडे रहस्येच दिसायला लागायची . त्याच वेळेला भा. रा. भागवतांचा बन्या उर्फ फास्टर फेणे ही आवडायला लागला . इतका कि तो काल्पनिक आहे हे सत्य पचवायला जड जाऊ लागले . असं वाटायचं कि त्याला जाऊन कधीतरी भेटलेच पाहिजे . त्याच बरोबरीने वेताळाच्या कॉमिक्स कथा खूप आवडायच्या . चि .वी. जोशींचे “ चिमणराव गुंड्याभाऊ ” पण मनाला खूप भावले होते . माझी ठाण्याला राहणारी मावशी तिकडून किशोर , कुमार , आनंद , चंपक अशी पुस्तके पार्सलने पाठवायची . तेंव्हा पंढरपुरात चांगलं पुस्तकांचं दुकान असं न्हवत . तेंडूलकरांचं एकमेव दुकान आमच्यासाठी वरदान होत . रहस्य कथा वाचून मी हि तेंव्हा तश्या कथा लिहिण्याचा केलेला प्रयत्न मला आठवतोय . त्याच प्रमाणे गल्लीत राहणाऱ्या अंजू वैद्यने आणि मी मिळून कुठून कुठून गोळा केलेले विनोद , चित्रे , कविता यांचे हस्तलिखित एकत्र करून ते आमच्या मित्रांपुरत प्रकाशित केलं होतं.
महाविद्यालीन जीवनात प्रवेश केल्या नंतर विट्याला शिक्षणासाठी असताना तिथल्या वाचनालयात व्यंकटेश माडगुळकरांचे " करुणाष्टक " वाचनात आले . माझ्या माहिती प्रमाणे हे मी वाचलेले पहिले संपन्न ललित लिखाण . त्यानंतर मग अश्या वैचारिक , ललित लिखाणांची ओढच लागली . याच वेळी वसंत सबनीसांची पुस्तके हि वाचनात आली . त्यांचे " बन्या बापू "मला खूपच आवडले इतके कि त्या आधारानेच मी माझी पहिली कथा " मी लाच घेतो " लिहिली ( १९८८मध्ये ) आणि गम्मत म्हणजे त्याच वर्षी ती " बुलंद " या दिवाळी अंकात छापूनही आली . म्हणजे माझ्या लिखाणाची प्रेरणा सबनीस आहेत असे म्हणायला हरकत नाही .जयवंत दळवींची " महानंदा " हि कादंबरी पण अशीच मनाला भावली होती . जणू त्या महानंदेच्या मी तेंव्हा प्रेमात पडलो होतो . त्यानंतर व पु काळे , माडगुळकर . शंकरराव खरात , द मा मिरासदार , अण्णा भाऊ साठे , गो नि दांडेकर , पु ल देशपांडे , अत्रे , जी ए कुलकर्णी अश्या नामवंतांची पुस्तके वाचण्याचा नादच लागला . तो आज पर्यंत . कालानुरूप मी सुध्धा लिखाण करत गेलो . वेगवेगळ्या दिवाळी अंकातून त्या कथा कविता प्रसिध्ध झाल्या . काही एकांकिका लिहिल्या आणि त्याचे प्रयोग केले . कथाकथनाचे हि अनेक ठिकाणी प्रयोग केले .
गेल्या वर्षी अचानक माझं एक स्वलिखित पुस्तक ( कथासंग्रह ) बाजारात आला . “ भंगार वाडा ” हे त्या पुस्तकाचं नाव . आमच्या वाड्यात चार ते पाच कुटुंबे गुण्या गोविंदाने , हसून खेळून नांदतात . हे आमच्या मधले भावबंध , आपुलकी , हसरा खेळकर पणा मी या कथा संग्रहात मांडलाय . अर्थात थोडी रहस्य आणि विनोदाची काल्पनिक फोडणी देऊन .आणखी चार पुस्तकाचं लिखाण तयार आहे . बघुयात कधी योग येतोय ते
पण हे सगळे शक्य झाले ते वाचनामुळे . पुस्तकांनी माझं जगणं समृद्ध केलं . अजूनही ते समृद्ध होतंच आहे . जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
........श्याम सावजी ......पंढरपूर