|| श्री ||
पंढरपूरच्या वायव्येला पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर असणारे गुरसाळे हे गाव विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे . माझ्या लक्षात मात्र हे गाव राहिलं आहे ते तिथं असणाऱ्या एका जुन्या पुराण्या गढी मुळं. ( गढीचा अर्थ खाली दिला आहे .)
आम्ही दहावीत असताना आम्हाला शाळेच्या वतीने एक अभ्यास म्हणून हा कारखाना दाखवण्यासाठी नेण्यात आलं होतं . तेंव्हा हा कारखाना नुकताच सुरु झाला होता . ओसाड माळरानावर हा कारखाना उभा होता . फारशी बांधकामं आजूबाजूला न्हवती . हे गुरसाळे गावही तेंव्हा सध्या इतकं विकसित झालेलं नव्हतं . कारखाना बघून झाल्यावर तिथल्या पत्र शेडमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जेवण केलं , मग कुणी ताणून दिली तर काही जण गाण्याच्या भेंड्या खेळत बसले . आम्ही चार पाच जण बाहेर टेकड्यांवरून भटकत आलो . अचानक पश्चिमेकडे काही अंतरावर आमची नजर गेली आणि एका टेकडीवर उभी असणारी किल्ल्यासारखी हि वास्तू दिसली . आमच्या भागात अशी वास्तू कधी दिसलेली नसल्याने आणि किल्ला हा प्रकार फक्त इतिहासाच्या पुस्तकातच बघितला असल्याने कुतूहलाने आम्ही त्या गढीच्या दिशेने निघालो . थोडे अंतर काट्या कुट्यातून चालल्यावर आम्ही त्या टेकडीवर असणाऱ्या गढी जवळ येउन पोहोचलो . एक भव्य दरवाजा , त्याच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरुज , थोडी अजून टिकून असलेली तटबंदी आमच्या नजरेला पडली . दरवाजातून आम्ही आत शिरलो . दोन्ही बाजूला उंच जोती होती . मग थोडे वळण आणि पुन्हा एक प्रवेश द्वार होते . त्यातून पुढे गेल्यावर आम्ही एका भग्न पठारावर येउन पोहोचलो . जागोजागी भुयारे दिसत होती . भूयारांचे बांधकाम आतून चांगले दगडी दिसत होते . आत उतरायला पायऱ्या होत्या . आमच्या पैकी काही धाडसी मित्रांनी त्या भुयारात उतरून डोकावून पाहिलं आणि आत लांबपर्यंत जाणारा मार्ग असल्याचं सांगीतलं . शिक्षकांच्या भीतीनं आणि वेळेत परत जायचं असल्यानं भुयारात जास्त लांब जाण्याचा आमचा विचार आम्ही टाळला आणि नंतर परत कधी या भुयारात जाण्याचं ठरवलं . उंच टेकडीवर ती गढी असल्याने तिथून चारी दिशांना लांबवरचं दृश्य दिसत होतं . अग्न्येये कडे असणारं पंढरपूर . काही अंतरावरून गढीला वळसा मारून वाहत पुढे गेलेली चंद्रभागा. दुरवर पसरलेली आसपासची शेतं .. त्या उध्वस्थ गढी मध्ये पाण्याच्या सोयीसाठी असणाऱ्या दोन मोठ्या चौकोनी विहिरी पण दिसल्या . गढीच्या त्या परिसरात काही वेळ फेरफटका मारून आम्ही आमच्या निवासस्थानी परतलो . मात्र त्याचं वेळी आम्ही ठरवलं होतं कि पुढच्या वेळी खास ह्या गढी साठी एका रविवारी यायचं .
काल काही कामानिमित्त कारखान्यावर आलो होतो तेंव्हा गढीच्या या आठवणी जाग्या झाल्या मग काम संपल्यावर गाडी गढीच्या दिशेने वळवली . योगायोगाने एक मित्र भेटले . त्यांनी गढी कडे नेलं. आता तिथे फक्त तो मुख्य दरवाजा उरला आहे . बुरुज , तट काही काही उरलेलं नाही . जमिनीवर असणारी भुयारं तशीच आहेत . त्या भुयारात काही अंतर जाण्याचा आम्ही प्रयत्न केला . त्या भुयारात जाण्याचा प्रयत्न आम्ही शाळेच्या त्या दिवसातही परत एकदा केला होता मात्र त्या वेळी जो विचित्र अनुभव आम्हाला आला तो मी पुढच्या भागात सांगेन .
पंढरपूरच्या वायव्येला पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर असणारे गुरसाळे हे गाव विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे . माझ्या लक्षात मात्र हे गाव राहिलं आहे ते तिथं असणाऱ्या एका जुन्या पुराण्या गढी मुळं. ( गढीचा अर्थ खाली दिला आहे .)
आम्ही दहावीत असताना आम्हाला शाळेच्या वतीने एक अभ्यास म्हणून हा कारखाना दाखवण्यासाठी नेण्यात आलं होतं . तेंव्हा हा कारखाना नुकताच सुरु झाला होता . ओसाड माळरानावर हा कारखाना उभा होता . फारशी बांधकामं आजूबाजूला न्हवती . हे गुरसाळे गावही तेंव्हा सध्या इतकं विकसित झालेलं नव्हतं . कारखाना बघून झाल्यावर तिथल्या पत्र शेडमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जेवण केलं , मग कुणी ताणून दिली तर काही जण गाण्याच्या भेंड्या खेळत बसले . आम्ही चार पाच जण बाहेर टेकड्यांवरून भटकत आलो . अचानक पश्चिमेकडे काही अंतरावर आमची नजर गेली आणि एका टेकडीवर उभी असणारी किल्ल्यासारखी हि वास्तू दिसली . आमच्या भागात अशी वास्तू कधी दिसलेली नसल्याने आणि किल्ला हा प्रकार फक्त इतिहासाच्या पुस्तकातच बघितला असल्याने कुतूहलाने आम्ही त्या गढीच्या दिशेने निघालो . थोडे अंतर काट्या कुट्यातून चालल्यावर आम्ही त्या टेकडीवर असणाऱ्या गढी जवळ येउन पोहोचलो . एक भव्य दरवाजा , त्याच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरुज , थोडी अजून टिकून असलेली तटबंदी आमच्या नजरेला पडली . दरवाजातून आम्ही आत शिरलो . दोन्ही बाजूला उंच जोती होती . मग थोडे वळण आणि पुन्हा एक प्रवेश द्वार होते . त्यातून पुढे गेल्यावर आम्ही एका भग्न पठारावर येउन पोहोचलो . जागोजागी भुयारे दिसत होती . भूयारांचे बांधकाम आतून चांगले दगडी दिसत होते . आत उतरायला पायऱ्या होत्या . आमच्या पैकी काही धाडसी मित्रांनी त्या भुयारात उतरून डोकावून पाहिलं आणि आत लांबपर्यंत जाणारा मार्ग असल्याचं सांगीतलं . शिक्षकांच्या भीतीनं आणि वेळेत परत जायचं असल्यानं भुयारात जास्त लांब जाण्याचा आमचा विचार आम्ही टाळला आणि नंतर परत कधी या भुयारात जाण्याचं ठरवलं . उंच टेकडीवर ती गढी असल्याने तिथून चारी दिशांना लांबवरचं दृश्य दिसत होतं . अग्न्येये कडे असणारं पंढरपूर . काही अंतरावरून गढीला वळसा मारून वाहत पुढे गेलेली चंद्रभागा. दुरवर पसरलेली आसपासची शेतं .. त्या उध्वस्थ गढी मध्ये पाण्याच्या सोयीसाठी असणाऱ्या दोन मोठ्या चौकोनी विहिरी पण दिसल्या . गढीच्या त्या परिसरात काही वेळ फेरफटका मारून आम्ही आमच्या निवासस्थानी परतलो . मात्र त्याचं वेळी आम्ही ठरवलं होतं कि पुढच्या वेळी खास ह्या गढी साठी एका रविवारी यायचं .
काल काही कामानिमित्त कारखान्यावर आलो होतो तेंव्हा गढीच्या या आठवणी जाग्या झाल्या मग काम संपल्यावर गाडी गढीच्या दिशेने वळवली . योगायोगाने एक मित्र भेटले . त्यांनी गढी कडे नेलं. आता तिथे फक्त तो मुख्य दरवाजा उरला आहे . बुरुज , तट काही काही उरलेलं नाही . जमिनीवर असणारी भुयारं तशीच आहेत . त्या भुयारात काही अंतर जाण्याचा आम्ही प्रयत्न केला . त्या भुयारात जाण्याचा प्रयत्न आम्ही शाळेच्या त्या दिवसातही परत एकदा केला होता मात्र त्या वेळी जो विचित्र अनुभव आम्हाला आला तो मी पुढच्या भागात सांगेन .
No comments:
Post a Comment