|| श्री ||
गेले दोन दिवस पंढरपुरात धुवाधार पाऊस पडतोय . तो ही नेमका रात्री . अगदी वेडया सारखा हा पाऊस काल कोसळत होता. मोठा आवाज करत . त्यात परवा लाईट गेल्या आणि मग आठवल्या लहानपणीच्या आणि तरुणपणीच्या अश्या काही पावसाळी रात्री . त्या आठवणी देतोय ..
-------------------------- -------------------------- -------------------------- -----
अजून आठवे ती रात्र पावसाची
काल रात्री पावसाच्या काही जोरदार सरी पंढरपुरात बरसून गेल्या . वीज चमकतच होती आणि गडगडाट करत कोसळली सुद्धा . नेमकी घरातली सरकारी वीज गेली . आम्ही काही मित्र गप्पा मारत बसलो होतो . एक मित्र म्हणाला , " बाहेर असा पावसाचा गोंधळ , विजांचा कडकडाट सुरु असताना घरातली वीज गेली कि रात्र संपता संपत नाही " . मग आमच्या पावसाळी रात्री आलेले अनुभव सांगण्याच्या गप्पा रंगल्या .
अश्या कित्येक भयावह पावसाळी रात्री मी पण अनुभवल्या आहेत . आमचं जुनं घर धाब्याचं होतं , मातीचं माळवद असलेलं . पावसाळ्यापूर्वी माळवदावरचं गवत आम्ही खुरपी घेऊन खुरपायचो . जेणे करून पावसाळ्यात पाणी मुरून घर गळू नये म्हणून . पण तरीही पावसाळ्यात घर गळायचंच . दिवसा काही वाटायचं नाही पण रात्री त्यातल्या त्यात वीज गेल्यावर खूप भेसूर वाटायचं . सवन्यावरचे ( उजेडासाठी माळवदाला असणारा झरोका ) पत्रे जोरात वाजायचे . पत्रे उडून त्यावर ठेवलेले दगड घरात पडतील का काय अशी भीती वाटायची . कंदिलाच्या उजेडात आम्ही बसलेलो असायचो. कडकडणारी वीज आमच्या घरावर कोसळू नये म्हणून माझी आजी अंगणात लोखंडी पहार ठेवायची . लोखंडी पहारेला वीज का म्हणून भिते ? हे कोडं मला तेंव्हा पडायचं.
ढग गडगडतात तो आवाज म्हणजे एक चेटकीण म्हातारी आभाळात जात्यावर पीठ दळत बसलेली असते , तिच्या जात्याचा तो आवाज असतो अश्या कल्पना तेंव्हा डोक्यात आणि मनात घर करून बसलेल्या होत्या . ती म्हातारी त्या भयाण अंधारात डोळ्यासमोर यायची . मग झोपही लागायची नाही . कुठल्याना कुठल्या देवाचा धावा मनातल्या मनात करत मी रात्र लौकर संपू दे अशी विनवणी त्या देवाला करायचो. मधेच कधी तरी डोळा लागायचा आणि सकाळी जाग यायची तेंव्हा प्रसन्न असा तेजस्वी उजेड सगळीकडे पसरलेला असायचा . नव्या घरात राहायला जाई पर्यंत अश्या कित्येक भेसूर पावसाळी रात्री मी अनुभवल्या .
एकदा नौवी दहावीत असताना चित्रपट बघायला गेलो होतो . बाहेर तुफान पाऊस पडत होता . टोकिजच्या बाहेर आलो तर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं . कसाबसा सरकारी दवाखान्यापर्यंत आलो तर तिथली पुरुषभर उंचीची भदबदी (मोठा नाला ) भरून वाहत होती . माझ्या कंबरे इतके पाणी रस्त्यावर होते . सरकारी लाईट बंद होते . पाण्याला ओढही चांगली होती . झक मारली आणि सिनेमाला आलो असं वाटलं . एक दिशा धरून अंधारात पाण्यातून कसं बसं घर गाठलं.
विट्याला असताना एका नाटकाच्या तालमीसाठी एका खेडेगावकडे मी आणि आमचे दिग्दर्शक तात्या कोळी मिळून निघालो होतो . संध्याकाळी बस मधून उतरून पाऊल वाटेने त्या गावाकडे निघालो आणि पावसाला सुरुवात झाली . ओसाड माळा वर एक झाडा खाली मी आणि तात्या थांबलो . अंधार पडलेला होताच. विजा चमकायला लागल्या . त्यात तात्यांना आठवलं कि वीज नेमकी झाडावरच कोसळते . मग त्या झाडा खालून बाहेर पडून भर पावसात चालत राहिलो आणि गाव गाठलं
जाता जाता :-.. निसर्ग काय आणि माणूस काय .. नियंत्रणात आहेत तोपर्यंत दोघेही सुंदर , जिवलग वाटतात . मात्र एकदा नियंत्रणाबाहेर गेले कि त्यांचं भेसूर रूप जाणवून जातं........ श्याम सावजी
—
गेले दोन दिवस पंढरपुरात धुवाधार पाऊस पडतोय . तो ही नेमका रात्री . अगदी वेडया सारखा हा पाऊस काल कोसळत होता. मोठा आवाज करत . त्यात परवा लाईट गेल्या आणि मग आठवल्या लहानपणीच्या आणि तरुणपणीच्या अश्या काही पावसाळी रात्री . त्या आठवणी देतोय ..
--------------------------
अजून आठवे ती रात्र पावसाची
काल रात्री पावसाच्या काही जोरदार सरी पंढरपुरात बरसून गेल्या . वीज चमकतच होती आणि गडगडाट करत कोसळली सुद्धा . नेमकी घरातली सरकारी वीज गेली . आम्ही काही मित्र गप्पा मारत बसलो होतो . एक मित्र म्हणाला , " बाहेर असा पावसाचा गोंधळ , विजांचा कडकडाट सुरु असताना घरातली वीज गेली कि रात्र संपता संपत नाही " . मग आमच्या पावसाळी रात्री आलेले अनुभव सांगण्याच्या गप्पा रंगल्या .
अश्या कित्येक भयावह पावसाळी रात्री मी पण अनुभवल्या आहेत . आमचं जुनं घर धाब्याचं होतं , मातीचं माळवद असलेलं . पावसाळ्यापूर्वी माळवदावरचं गवत आम्ही खुरपी घेऊन खुरपायचो . जेणे करून पावसाळ्यात पाणी मुरून घर गळू नये म्हणून . पण तरीही पावसाळ्यात घर गळायचंच . दिवसा काही वाटायचं नाही पण रात्री त्यातल्या त्यात वीज गेल्यावर खूप भेसूर वाटायचं . सवन्यावरचे ( उजेडासाठी माळवदाला असणारा झरोका ) पत्रे जोरात वाजायचे . पत्रे उडून त्यावर ठेवलेले दगड घरात पडतील का काय अशी भीती वाटायची . कंदिलाच्या उजेडात आम्ही बसलेलो असायचो. कडकडणारी वीज आमच्या घरावर कोसळू नये म्हणून माझी आजी अंगणात लोखंडी पहार ठेवायची . लोखंडी पहारेला वीज का म्हणून भिते ? हे कोडं मला तेंव्हा पडायचं.
ढग गडगडतात तो आवाज म्हणजे एक चेटकीण म्हातारी आभाळात जात्यावर पीठ दळत बसलेली असते , तिच्या जात्याचा तो आवाज असतो अश्या कल्पना तेंव्हा डोक्यात आणि मनात घर करून बसलेल्या होत्या . ती म्हातारी त्या भयाण अंधारात डोळ्यासमोर यायची . मग झोपही लागायची नाही . कुठल्याना कुठल्या देवाचा धावा मनातल्या मनात करत मी रात्र लौकर संपू दे अशी विनवणी त्या देवाला करायचो. मधेच कधी तरी डोळा लागायचा आणि सकाळी जाग यायची तेंव्हा प्रसन्न असा तेजस्वी उजेड सगळीकडे पसरलेला असायचा . नव्या घरात राहायला जाई पर्यंत अश्या कित्येक भेसूर पावसाळी रात्री मी अनुभवल्या .
एकदा नौवी दहावीत असताना चित्रपट बघायला गेलो होतो . बाहेर तुफान पाऊस पडत होता . टोकिजच्या बाहेर आलो तर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं . कसाबसा सरकारी दवाखान्यापर्यंत आलो तर तिथली पुरुषभर उंचीची भदबदी (मोठा नाला ) भरून वाहत होती . माझ्या कंबरे इतके पाणी रस्त्यावर होते . सरकारी लाईट बंद होते . पाण्याला ओढही चांगली होती . झक मारली आणि सिनेमाला आलो असं वाटलं . एक दिशा धरून अंधारात पाण्यातून कसं बसं घर गाठलं.
विट्याला असताना एका नाटकाच्या तालमीसाठी एका खेडेगावकडे मी आणि आमचे दिग्दर्शक तात्या कोळी मिळून निघालो होतो . संध्याकाळी बस मधून उतरून पाऊल वाटेने त्या गावाकडे निघालो आणि पावसाला सुरुवात झाली . ओसाड माळा वर एक झाडा खाली मी आणि तात्या थांबलो . अंधार पडलेला होताच. विजा चमकायला लागल्या . त्यात तात्यांना आठवलं कि वीज नेमकी झाडावरच कोसळते . मग त्या झाडा खालून बाहेर पडून भर पावसात चालत राहिलो आणि गाव गाठलं
जाता जाता :-.. निसर्ग काय आणि माणूस काय .. नियंत्रणात आहेत तोपर्यंत दोघेही सुंदर , जिवलग वाटतात . मात्र एकदा नियंत्रणाबाहेर गेले कि त्यांचं भेसूर रूप जाणवून जातं........ श्याम सावजी
—

No comments:
Post a Comment